Monday 2 December 2013

राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना

राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना

शिष्यवृत्ती
शिक्षणापासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना लागू आहे.
शिष्यवृत्तीचे स्वरूप 
  • इ.९ वी व इ.१० वी मध्ये शिकणाऱ्या ग्रामीण भागातील निवडक गुणवंत विद्यार्थ्यांना दरमहा रु. २५०/-
  • इ. ११ वी, इ. १२ वी मध्ये शिकणाऱ्या निवडक गुणवंत विद्यार्थ्यांना दरमहा रु. ३००/-
  • पदवी शिक्षण घेणाऱ्या (बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., इ.)निवडक गुणवंत विद्यार्थ्यांना रु. ५००/- प्रतिमहा.
  • पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवंत निवडक विद्यार्थ्यांना रु. ७५०/-दरमहा.
  • एकूण शिष्यवृत्त्या - इ. ९ वी व इ.१० वी साठी प्रत्येक तालुक्यास दोन .
  • इ. ११ वी पासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत राज्य शासनाच्या गुणवत्ता यादीनुसार .
पात्रता 
  • विद्यार्थी इ. ९ वी व इ.१० वी मध्ये शासकीय शाळेमध्ये शिकणारा असावा.
  • इ.१० वी नंतर पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी शास्त्र, वाणिज्य शाखेसाठी ६० टक्केपेक्षा जास्त व ह्युमैनिटी शाखेसाठी ५५ टक्केपेक्षा जास्त.
  • इतर कोणतेही गुणवत्ता शिष्यवृत्ती अनुदान घेतलेले नसावे.
  • मान्यताप्राप्त संस्थेमध्ये शिक्षण घेत असावा.
  • कौटुंबिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
निवड प्रक्रिया 
  • इ. ८ वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे तालुकानिहाय गुणवत्ता यादीतील प्रत्येक तालुक्यातील पहिले दोन विद्यार्थी.
  • इ. १० वी नंतरच्या शिक्षणासाठी राज्य सरकारने तयार केलेल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थी.

No comments:

Post a Comment