Monday 2 December 2013

प्राथमिक शिक्षण

प्राथमिक शिक्षण

प्राथमिक शिक्षण
ज्या वयात काहीही कळत-समजत-उमजत नाही, त्याच काळात प्राथमिक शिक्षणाला  सुरुवात होते. लहान वयात शिक्षणाची आणि अभ्यासाची गोडी लागावी. हा पालकांचा उद्देश असतो. बालवयात मुलांना स्वातंत्र्य दिले, तर त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा अंदाज येतो.
प्राथमिक शिक्षण म्हणजे इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी पर्यंतचे शिक्षण होय. शिक्षणाची पद्धत साधी, सरळ, सोपी असते. लहान मुलांचे हसणे, रडणे, गोड बोलणे, मस्ती करणे, खेळणे यांमधून शिक्षकांना विद्यार्थी घडवायचा असतो. ‘शिस्त’ लावण्याची मुख्य जबाबदारी शिक्षकांवर असते. महानगरपालिकेच्या आणि खासगी शाळांमधून प्राथमिक शिक्षणाची सर्वत्र उपलब्धता आहे. 
प्राथमिक शिक्षण ही विद्यार्थी शिक्षणाची पहिली पायरी आहे.

शिक्षण म्हणजे काय?

शिक्षण
शाळेत नवीनच प्रवेश घेतलेल्या मुलांमध्ये आपल्याला विविध वृत्ती, प्रवृत्ती दिसून येतात. काही मुले हुशार, काही चुणचुणीत, काही मंद गती, काही धीट तर काही अबोल असतात. काही मुले अनोळखी शिक्षकांशी लगेच गप्पा मारायला सुरुवात करतात. काही रडतात. हे त्यांच्यावरील संस्कार त्यांनी घरातून आपल्या आई वडीलांकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे उचललेले असतात. 
मुलांनी नीट वळण लागावे यासाठी पालकांनी दररोज थोडातरी वेळ मुलांसाठी काढणे आवश्यक आहे. त्यांच्यासोबत गप्पा मारणे, खेळणे, चित्रं काढणे अशा साध्या साध्या गोष्टीही मेंदूची शक्ती वाढवू शकतात. त्यामुळे मुलांच्या शरीराबरोबर मानसिक विकासही होतो.वर्गामध्ये मराठी विषयात पहिला येणारा विध्यार्थी उत्तम भाषण करू शकत नाही, पण कमी गुण मिळवणारा विध्यार्थी मात्र उत्तम भाषण करू शकतो, हे कशामुळे घडते? कारण त्यांच्या त्या त्या क्षमता विकसित झालेल्या नसतात. तेव्हा शिक्षकाने सगळ्या मुलांना लिखाणाबरोबरच वाचन, संभाषण या क्षमताही अवगत झाल्या पाहिजेत इकडे लक्ष दिले पाहिजे. ही कौशल्ये प्रत्येक मुलाला प्राप्त होण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन केले पाहिजे.तज्ञांच्या मते शिक्षण म्हणजे बाहेरून ज्ञान आत घालण्याची किंवा वरून मुलांच्या मनावर लादण्याची गोष्ट नसून मुलांमधील सुप्त शक्तींचा विकास करण्याची प्रक्रिया असते.

शिक्षण व राष्ट्रीय विकास

राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेचा विकास करण्यासाठी शाळेला पुढील उपक्रम करता येतील.अभ्यासक्रमातील विविध विषय शिकवतांना मनात प्रादेशिकता वाढण्याऐवजी राष्ट्रीयत्व कसे वाढेल हे पहावे. उदा. इतिहास हा विषय शिकवतांना एखाद्या प्रदेशातील राजाचे अथवा संताचे कार्य त्या प्रदेशापुरते मर्यादित नसून सर्व राष्ट्राला मार्गदर्शक कसे झाले हे सांगावे.विद्यार्थ्यांच्या मनात न्याय, समता, स्वातंत्र्य, व बंधुता ही मूल्ये निर्माण होतील असे उपक्रम शाळांनी आयोजीत करावे.
मराठी, हिंदी बरोबर संस्कृत भाषेच्या अध्यापानालाही शाळेतून महत्वाचे स्थान मिळावे. कारण त्या भाषेत प्राचीन संस्कृती वापर्म्पारा यांचे लेखन आहे. त्यांचाही विध्यार्थ्यांना परिचय होईल.भारतीय संस्कृती भाषा, धर्म, ऐतिहासिक पुरुष, समाजसुधारक इत्यादी संबंधीची छोटी छोटी पुस्तके विध्यार्थ्यांना पूरक वाचनासाठी द्यावीत. शाळेत राष्ट्राय गीतांचे गायन करावे. प्रत्येक शाळेत एनसीसी, एसीसी, स्काउट व गाईड असावे.
विद्यार्थ्याला देशातील तीर्थक्षेत्रे, प्रेक्षणीय स्थळे, औद्योगिक केंद्रे, ऐतिहासिक व राष्ट्रीय स्मारके दाखवावीत. त्यांना गिरण्या , कारखाने, बाजार व वस्तुंचे मॉल्स हे देखील दाखवता येतील.युनोस्कोने अनेक भाषांतील ग्रंथांची भाषांतरे केली आहेत. या ग्रंथाचाही विद्यार्थ्याला पूरक वाचन म्हणून उपयोग करून घेता येईल.

No comments:

Post a Comment