Monday 2 December 2013

स्पर्धेला सामोरे जाताना (परीक्षा- रिझल्टमधील तीव्र स्पर्धा सांभाळण्यासाठी)

स्पर्धेला सामोरे जाताना (परीक्षा- रिझल्टमधील तीव्र स्पर्धा सांभाळण्यासाठी)

स्पर्धेला
परीक्षेत मार्क कमी मिळाले, तर प्रवेश मिळणार नाही, बाकीचे पुढे जातील अशी वाक्य परीक्षेच्या आधी मुलांना सतत ऐकावी लागतात. अॅडमिशन ते प्रत्यक्ष प्रवेश या सगळ्यामध्ये प्रचंड स्पर्धेला सामोरे जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागते. ही स्पर्धा निभावून नेताना येणाऱ्या ताणावर मात करण्यासाठी गरज असते, ती सकारात्मक विचारांची, सक्षमपणे आलेली परिस्थिती स्वीकारण्याची. त्यासाठी काही गोष्टीं आत्मसात करण्याची आवश्यकता असते. 
  • वेळेचे योग्य नियोजन- सुरुवातीपासूनच अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास, परीक्षेनंतर ताण जाणवणार नाही. 
  • मानसिक स्वास्थ्य – बुद्धी ही गोष्ट आपल्या हातात नाही. पण परीक्षेत यश मिळविण्यासाठी कसून प्रयत्न करणे ही गोष्ट तुमच्या हातात आहे. त्यात कमी पडू नका. 
  • सकारात्मक विचार- अपयश आले तर काय या विचाराने खचून जाऊ नका. अपयश का आले याच्यापेक्षा ते अपयश यशात कसे बदलता येईल याचा विचार करा.
  • अपेक्षा लादू नका – परीक्षा, रिझल्टची तीव्र स्पर्धा समजून घेऊन, पालकांनीही आपल्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत. पालकांनी त्यांना आधार द्यायला हवा. मुलांच्या मेहनतीचे, त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करायला हवे. आपल्या मुलांची कुवत ओळखून मुलांकडून अपेक्षा ठेवली पाहिजे हे लक्षात ठेवा. आपल्या मुलांची तुलना दुसऱ्या मुलांबरोबर करणे टाळाच. 
परीक्षा म्हणजे तुमच्या मानसिक आणि शारीरिक कुवतीचा कस पाहणारी एक व्यवस्था असते. त्यामुळे स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी मनापासून प्रयत्न करा. यश नक्कीच तुमचे असते. 
एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी श्वसनाचे साधे व्यायाम, ध्यान धारणा उपयोगी पडते. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मननिकोप बनतं. 
दहावी आणि बारावीच्या परीक्षांप्रमाणे इतर प्रवेश परीक्षांना आता सुरुवात होईल. एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या विविध परीक्षांवर अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून असल्याने ताण हा असणारच. या ताण टाळण्यासाठी सुरुवातीपासून अभ्यासाची तयारी करणंच उत्तम. 

No comments:

Post a Comment