Monday 2 December 2013

समाजातीलदुर्बल घटकातील मुलांना शिक्षण

समाजातीलदुर्बल घटकातील मुलांना शिक्षण

मुलांना शिक्षण
समजातील दुर्बल घटकांना शिक्षण मिळणे गरजेचे आहे. दुर्बल घटकातील मुलांचे आणि पालकांचे शिक्षणाविषयी जाणीवा परिपक्व नसतात. आपली पाल्याने वर्गात उपस्थित राहणे, ही बाब आवश्यक आहे. परंतू ही गोष्टही पालकवर्ग गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे दुर्बल घटकातील पालकांची विचारधारा बदलणे आवश्यक आहे. मुलांचे अभ्यासात अजिबात लक्ष नसते, रोजच्या व्यापातून पालकांना मुलाकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. या परिस्थितीतून मुलांना आपलेसे करण्यासाठी शिक्षकांना खूप मेहनत घ्यावी लागते.वेगळे सन मुलांबरोबर साजरे करतात.
शिक्षक वेगवेगळे सण मुलांबरोबर साजरे करतात. त्या सणाच्या माध्यमातून खेळ – स्पर्धा घेतले जातात. त्यामुळे मुले आनंदी राहतात. उदा. मकर संक्रांतीला तिळगुळ आणि लाडूचा कार्यक्रम, शाळेत पतंग उडवणे, गणेशोत्सवात गणपती शाळेत आणून त्याची पूजा-आरती दररोज करणे, रक्षाबंधन. असे अनेक क्षणांचे महत्व शिक्षक मुलांना सांगतात आणि मुले उत्साहाने सहभागी होतात. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला मुलांना स्वातंत्र्याचे व गणतंत्र महत्त्व शिक्षक सांगतात , त्या दिवशी सर्व शाळेत ध्वज वंदन आणि राष्ट्रगीत म्हटले जाते.
निरनिराळ्या सणांच्या व खेळांच्या माध्यमातून मुलांना शिक्षणाची आणि अभ्यासाची गोडी लागावी , हा शिक्षकांचा त्यामागचा उद्देश असतो. 

No comments:

Post a Comment